Saturday 13 January 2018

तिळगुळ घ्या गोड बोला !!!



तिळगुळ घ्या गोड बोला !!!

© प्रमोद जोशी

भोगीची भाजी

पौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती! मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस! स्त्रिया ह्या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन (ह्या भाजीत तिळाचा वापर आवश्यक असतो) एक भाजी केली जाते. 
ही ‘भोगीची भाजी’, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी असा देवाला खास नैवैद्य दाखविला जातो.
ह्या भाजीला 'मिक्स वेजेटेबल' असेही म्हणतात. काही वेळा 'खेंदाट' असे पण म्हणतात. काही का असेना , पण भाजी असते मात्र खूप टेस्टी. आणि आजच्या दिवशी काय माहित पण खूपच टेस्टी म्हणजे जास्तच गोड लागते. आधीच मुळात थंडी असल्याने या दिवसात भूक जरा जास्तच लागते. आणि त्यात ही लज्जतदार थाळी भूक आणखीनच चाळवते.
मग, का थांबलात करा सुरवात जेवायला !!!