Monday 8 January 2018

काळजाला भिडणारी कविता

शालेय अभ्यासक्रमात काही काही कथा कविता अशा असतात की त्या  लहानपण असूनसुद्धा काळजाला लगेच भिडतात. 

आणि त्यातून शिकवणारे अध्यापक जर जीव ओतून शिकवत असतील तर....घी में शक्कर !!!
खरच अशा शिक्षकांना मानाचा मुजरा....

कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची इयत्ता सातवीच्या कुमारभारती पुस्तकात असलेल्या या कवितेचा आणि गाईंचा तसा काही संबंध नाही. आठ-नऊ वर्षांच्या आपल्या रूसलेल्या-रडवेल्या चिमुरडीची समजूत घालत असलेल्या बापाचे मनोगत कथन करणारी ही कविता…

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या..
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला..
कोण माझ्या बोलले गोरटीला

तुला लंकेच्या पार्वतीसमान..
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण..
“अहा, आली ही पहां भिकारीण”
पंकसंपर्के का कमळ भिकारी..?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी..?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी..?
कशी तुही मग मज मुळी भिकारी..?
नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू..
विलासाची होशील मोगरी तू
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते..?
न ये वदता अनुभवी जाणती ते
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना..?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया
“गावी जातो” ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, “येते मी, पोर अज्ञ वाचा..!”
-कवी बी ( नारायण मुरलीधर गुप्ते )



© प्रमोद जोशी

झी युवाचे प्रेक्षक... आणि अंजली....


झी युवा ही वाहिनी खूप चांगल्या चांगल्या मालिका देतीय... त्यामुळे प्रेक्षक वर्ग तिकडे खेचला जातोय....
सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेली "अंजली" मालिका जी मराठी मधील प्रथमच हॉस्पिटल वरची आधारित मालिका आहे. सर्व casting नि आपल्या भूमिकांना न्याय दिलाय.... पण आता सध्या एक twist आलाय आणि त्यामुळं कदाचित , आणि काही प्रेक्षक वर्गाला तो twist आवडला नसेल कदाचित.... पण त्यावर सोशल मेडिया वर बरच बोललं जातय ... म्हणजे असं का , तसं का वगेरे वगेरे.

शेवटी मालिकाच ती....

पण ती शेवटपर्यंत लोकांना निखळ आनंद देईल कारण प्रेक्षकांची अंजलीवर असीम भक्ती आहे त्यामुळं तिला यश तर मिळेलच ... नाही का...?

बाकी ही मालिका आनंद देतेय हे मात्र नक्की...

संवाद लेखन उत्कृष्ट आहे त्यामुळे प्रत्येक क्षण अप्रतिम...


अंजली व असीम यांच्यातील क्षण 

पण मला एक कळत नाहीये कि, मालिकेचा कणा डॉक्टर खानापूरकर यांना केव्हा आणणार आहेत.... खरं तर त्यांच्या शिवाय प्रत्येक एपिसोड अपूर्ण आहे....

तुम्हाला काय वाटतं....


© प्रमोद जोशी
(फोटो आंतरजालावरून साभार)