Wednesday 17 January 2018

गुरुवार

गुरुवार म्हणजे दत्ताचा वार. 

भाविक गुरुवारी दत्ताची भक्ती करतात. दर्शन घेतात. उपवास करतात. दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश म्हणजेच GOD.  देव म्हणजे साहेबांच्या भाषेत  GOD.
आता GOD ला थोडसं आणखी जाणून घेऊया.


G म्हणजे  Generates किवा निर्माण. हे कार्य  ब्रम्हदेव करतात. 

O म्हणजे  Operates किवा पालन पोषण करणे.हे कार्य विष्णू देव करतात.
D म्हणजे  Destroy किवा  नाश करणे. हे कार्य शंकर – महेश करतात.

देव म्हणजे एक अदृश्य अशी शक्ती आहे. देव दाता आहे. तो मनोभावे मागितले कि सर्व देतो अशी एक श्रद्धा आहे.

पण मित्रानो, खरे सांगू. देव मागितलेले सर्व देत नाही आणि न मागतानाही दिल्या शिवाय राहत नाही. आपण जेव्हा देवाकडे काही मागतो, तेव्हा त्याचा अर्थ ते आपल्याकडे  नाही असा होतो. काही वेळा जे मिळाले आहे ते टिकावे म्हणून प्रार्थना करतो. मला तर असं वाटतं कि आपली गरज आणि लायकी ही आपल्यापेक्षा देवालाच  जास्त माहित असते. 

आपल्याला आयुष्यात जे हवे आहे ते मिळेल ह्याची खात्री नसते. त्यामुळे जे मिळाले आहे त्यावर प्रेम करण्यास शिकले पाहिजे.

खरं तर आपण आत्ता या क्षणी आहोत हेच मुळी त्याच्या कृपा आशीर्वादामुळे. 
मला या चार ओळी लिहिण्याची  स्फूर्ती व शक्ती तोच तर देतोय.

आजकाल आपण formality म्हणून एकमेकांना thanks म्हणत असतो. 
मग ज्याने आपल्याला आजचा दिवस दाखवला, त्याचा आनंद उपभोगू दिला त्या देवाचे निदान रात्री निद्राधीन होण्यापूर्वी एकदा नामस्मरण करून आभार मानले तर काय हरकत आहे. 

काय माहित उद्या मिळेल किंवा नाही.


© प्रमोद जोशी

Saturday 13 January 2018

तिळगुळ घ्या गोड बोला !!!



तिळगुळ घ्या गोड बोला !!!

© प्रमोद जोशी

भोगीची भाजी

पौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती! मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस! स्त्रिया ह्या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन (ह्या भाजीत तिळाचा वापर आवश्यक असतो) एक भाजी केली जाते. 
ही ‘भोगीची भाजी’, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी असा देवाला खास नैवैद्य दाखविला जातो.
ह्या भाजीला 'मिक्स वेजेटेबल' असेही म्हणतात. काही वेळा 'खेंदाट' असे पण म्हणतात. काही का असेना , पण भाजी असते मात्र खूप टेस्टी. आणि आजच्या दिवशी काय माहित पण खूपच टेस्टी म्हणजे जास्तच गोड लागते. आधीच मुळात थंडी असल्याने या दिवसात भूक जरा जास्तच लागते. आणि त्यात ही लज्जतदार थाळी भूक आणखीनच चाळवते.
मग, का थांबलात करा सुरवात जेवायला !!!

Monday 8 January 2018

काळजाला भिडणारी कविता

शालेय अभ्यासक्रमात काही काही कथा कविता अशा असतात की त्या  लहानपण असूनसुद्धा काळजाला लगेच भिडतात. 

आणि त्यातून शिकवणारे अध्यापक जर जीव ओतून शिकवत असतील तर....घी में शक्कर !!!
खरच अशा शिक्षकांना मानाचा मुजरा....

कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची इयत्ता सातवीच्या कुमारभारती पुस्तकात असलेल्या या कवितेचा आणि गाईंचा तसा काही संबंध नाही. आठ-नऊ वर्षांच्या आपल्या रूसलेल्या-रडवेल्या चिमुरडीची समजूत घालत असलेल्या बापाचे मनोगत कथन करणारी ही कविता…

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या..
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला..
कोण माझ्या बोलले गोरटीला

तुला लंकेच्या पार्वतीसमान..
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण..
“अहा, आली ही पहां भिकारीण”
पंकसंपर्के का कमळ भिकारी..?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी..?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी..?
कशी तुही मग मज मुळी भिकारी..?
नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू..
विलासाची होशील मोगरी तू
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते..?
न ये वदता अनुभवी जाणती ते
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना..?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया
“गावी जातो” ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, “येते मी, पोर अज्ञ वाचा..!”
-कवी बी ( नारायण मुरलीधर गुप्ते )



© प्रमोद जोशी

झी युवाचे प्रेक्षक... आणि अंजली....


झी युवा ही वाहिनी खूप चांगल्या चांगल्या मालिका देतीय... त्यामुळे प्रेक्षक वर्ग तिकडे खेचला जातोय....
सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेली "अंजली" मालिका जी मराठी मधील प्रथमच हॉस्पिटल वरची आधारित मालिका आहे. सर्व casting नि आपल्या भूमिकांना न्याय दिलाय.... पण आता सध्या एक twist आलाय आणि त्यामुळं कदाचित , आणि काही प्रेक्षक वर्गाला तो twist आवडला नसेल कदाचित.... पण त्यावर सोशल मेडिया वर बरच बोललं जातय ... म्हणजे असं का , तसं का वगेरे वगेरे.

शेवटी मालिकाच ती....

पण ती शेवटपर्यंत लोकांना निखळ आनंद देईल कारण प्रेक्षकांची अंजलीवर असीम भक्ती आहे त्यामुळं तिला यश तर मिळेलच ... नाही का...?

बाकी ही मालिका आनंद देतेय हे मात्र नक्की...

संवाद लेखन उत्कृष्ट आहे त्यामुळे प्रत्येक क्षण अप्रतिम...


अंजली व असीम यांच्यातील क्षण 

पण मला एक कळत नाहीये कि, मालिकेचा कणा डॉक्टर खानापूरकर यांना केव्हा आणणार आहेत.... खरं तर त्यांच्या शिवाय प्रत्येक एपिसोड अपूर्ण आहे....

तुम्हाला काय वाटतं....


© प्रमोद जोशी
(फोटो आंतरजालावरून साभार)

Sunday 7 January 2018

देव

देव आहे आणि देव नाही असे मानणारे दोन विचारप्रवाह नेहमीच आपल्याला आजूबाजूच्या माणसांमध्ये दिसतात. देव ही निरंकारी गोष्ट आहे असं एक मतआहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे.
 देव सर्वव्यापी आहे आणि तो सगळ्यात आहे.आणि तो कोणत्याही माध्यमातून, रूपातून अभिव्यक्त होऊ शकतो, प्रकट होऊ शकतो ही भावना ज्या प्रमाणे असंख्य लोकांच्या मनात आहे  
त्याच प्रमाणे मी देव मानत नाही , माझी मेहनत , माझे कष्ट यांवर माझा विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही असे मानणारे सुद्धा अनेक आहेत.आपल्याकडे आस्तिक हे संख्येने खूपच जास्त आहेत. नास्तिकपणा हा केवळ एक भूमिका म्हणून स्वीकारलेली भावना नसते तर देव असण्याची विचारधारा त्यांना पटत नसते म्हणूनच ती स्वीकारलेली असते. आजच्या युगातील हाच विचार घेऊन ही मालिका छोट्या पडद्यावर अवतरली आहे.


श्रद्धा आणि अतिश्रद्धा यात समन्वय साधायला आलेल्या देवाची गोष्ट देवा शप्पथ या मालिकेतून गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पहायला मिळते आहे.  ही मालिका झी युवा मार्फत प्रसारित केली जात आहे. 
या मालिकेत देव म्हणजेच खट्याळ कृष्ण उर्फ आजचा क्रिश च्या भूमिकेत क्षितिश दाते आहे तर त्याच बरोबर त्याचा नास्तिक भक्त श्लोकच्या भूमिकेत संकर्षण कऱ्हाडे आहे. यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे , शाल्मली टोळ्ये , अभिषेक कुलकर्णी , कौमुदी वालोकर चैत्राली गुप्ते , आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत .
झी युवा ही अगदी अल्पावधीत लोकप्रिय झालेली मराठी वाहिनी आहे. झी युवा ही वाहिनी एक वेगळं आणि फ्रेश कन्टेन्ट देण्यासाठी आजच्या प्रेक्षकांमध्ये ओळखली जातेय. देवाशप्पथ ही एक पूर्णपणे वेगळीसंकल्पना असून या मालिकेतून देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज पर्यंत अनेक पौराणिक मालिका प्रेक्षकांनी पहिल्या आहेत, पण देवाशप्पथ ही आजच्या काळातील गोष्ट असून आधुनिक काळातही देव त्याच्या भक्ताशी कश्याप्रकारे जोडला आहे, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक वेगळ्या नजरेतून प्रेक्षक अनुभवत आहेत. त्याचप्रमाणे जर देवाला आजच्या काळात खरंच पृथीतलावर यायला लागलं तर काय गंम्मत घडेल हे सुद्धा या मालिकेतून पहायला मिळत आहे.

बघू या पुढे काय काय घडते ते.

(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

© प्रमोद जोशी

Monday 1 January 2018

नव वर्षाचे स्वागत




         नवीन वर्ष सर्वाना सुखाचे व समृद्धीचे जावो 



नवीन वर्ष


                             Happy New Year 2018              



(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार)